धाराशिव : सनई चौघड्याचे मंगलसुरात, पै पाहुण्यांच्या लगबगीत लोकमंगल फाउंडेशनने धाराशिवमध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर 15 रेशीमगाठी बांधल्या. सकाळपासूनच मांडवात लग्न विधीची सुरुवात झाली होती . लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आ. सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा छायादीप मंगल कार्यालय येथे दुपारी 12 वाजून 31 वाजता झाला.
फाउंडेशनच्यावतीने वधू-वरांना हळदीचे कपडे,अक्षदेचे कपडे रुखवत,मणीमंगळसूत्र, जोडवी, भांडी आदी संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या.व समाजउपयोगी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या मंगलप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, चेअरमन सुधीर रास्ते, पंडित नाना लोमटे, बालाजी शिंदे, रामदास कोळगे, गजानन वडणे, प्रभाकर मुळे, अनिल जाधव, मकरंद लबडे, विजय शिंगाडे, बाबा ढोरकर, अर्जुन कदम, अजय दोणे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते, लोकमंगल फाउंडेशनवर प्रेम करणारे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 19 वे वर्ष आहे. आतापर्यंत फाउंडेशनने जवळपास 3089 सर्वधर्मीय सामुदायिक विवाह लावले आहेत.