येस न्युज मराठी नेटवर्क : इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठ्यासाठी आणि 62 हजार जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलणे त्यावर सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च करणे याला उद्धव ठाकरे सरकारने मंजुरी दिल्यामुळे सोलापूरकरांचा रोष अधिकच तीव्र होऊ झाला आहे. वास्तविक पहाता उजनीतील सांडपाणी घेऊन जाणे असा शब्दछल करत सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचनाच्या योजना अर्धवट असताना उजनीतून पाणी इंदापूरला नेले जात आहे. ही योजना मंजूर केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतःच्या फेसबुक पोस्टवरून ठाकरे सरकारचे अभिनंदन केले आहे पुणे जिल्ह्यातील दैनिकांमध्ये देखिलि या चया बातम्या प्रसारित झाल्या.
मात्र उजनी धरणातील एक थेंब देखील इंदापूरला नेणार नाही तसे झाल्यास राजकीय संन्यास घेऊ असं दिशाभूल करणार वक्तव्य पालकमंत्र्यांनी सोलापूरात केलं. येस न्यूज मराठीने देखील याबाबत आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. आजही सोलापुरातील दैनिक तरुण भारत संवाद ,लोकमत, दिव्य मराठी, सकाळ ,दैनिकांनी याबाबत सडेतोड आवाज उठवला आहे. पत्रकार आणि उजनी चे अभ्यासक रजनीश जोशी यांनीही कशी योजना राबवली जाणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कुंभारगाव आहे. तेथील उजनी जलाशयात दहा हजार हॉर्सपॉवर क्षमतेचा वीज पंप बसवण्यात येईल. तेथून शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात (खडकवासला) ते सोडण्यात येईल. कुंभारगाव ते शेटफळगढे हे अंतर दहा किलोमीटर आहे. तेथून सणसर कटच्या माध्यमातून नीरा डाव्या कालव्यात ते वळवले जाईल. आणि 22 गावांना सिंचनासाठी ते पुरवण्यात येईल.यामुळे सोलापूरकरांच्या जल नियोजनावर परिणाम होईल हे मात्र निश्चित याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आता आक्रमक पणे पुढे येणे गरजेचे आहे.