धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले
धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जय किसान आणि परिवर्तन पॅनल मध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यात मुख्य लढत असून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या ठिकाणी 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम असल्याने त्यांनी 18 जागांवर 15 नवीन उमेदवार दिले असून उर्वरित तीन उमेदवारांना अमरीश पटेल यांनी पाठिंबा दिला आहे, एकंदरीत जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असून आगामी निवडणुकांची या बाजार समितीच्या निवडणुका नांदी ठरणार असून राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नंतर प्रथमच बाजार समितीचे निवडणूक होत आहेत यामुळे कोणत्या पक्षाच्या पॅनलला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..
भंडारा जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रफुल्ल पटेल, परीणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे तर काँग्रेसची एकला चलोची भुमिका आहे. शेतकरी विकास पॅनेल आणि शेतकरी परीवर्तन पॅनेल आमने-सामने आहेत. भंडारा जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपाने अभद्र युती करीत काँग्रेसला एकटे पाडले आहे. त्यामुळं काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकला चलोची भुमिका घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील 9 बाजार समितीसाठी होणारी निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 6 बाजार समितीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीमध्ये आठ बाजार समित्यासाठी उद्या मतदान होणार असून दोन बाजार समितीचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे.