मुंबई : राज्यात पुन्हा मान्सून चांगला सक्रीय झाला असताना दडी मारली. मात्र, भारतीय हवामान विभागाने पुन्हा जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नंदूरबार या जिल्ह्यात पावसाचा जोर नसेल असे सांगण्यात आले आहे.जोरदार पाऊस कोसळ्याची शक्यता असताना कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.जरी मॉन्सून आतापर्यंत उत्तर-पश्चिम भारतापासून दूर राहिला असला तरी परंतु तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील इतर भागात त्याची स्थिती मजबूत आहे. केरळ, लक्षद्वीप, तटीय कर्नाटक आणि पुडुचेरी याशिवाय बर्याच ठिकाणी तेलंगणा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडला. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रापासून दक्षिण-पश्चिम वारा आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.11 जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडेल.