सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांची माहिती
सोलापूर : ग्रामीण भागातीलसमस्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ मे पासून कराड ते सातारा पायी मोर्चा व पुढे मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी दिली.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र व रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील समस्या संदर्भाने अनेक मागण्या यापूर्वी केलेले आहेत ग्रामीण भागाच्या समस्या बाबत कोणतेही सरकार लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही पंचायत राज मध्ये दुर्लक्ष केले जाते ग्रामपंचायतीवर व पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली जाते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात मतदानाचा अधिकार मिळावा आशा अनेक मागण्या संदर्भाने पाठपुरावा करूनही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सरपंच परिषदेच्या वतीने केलेल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच परिषद व रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कराड ते सातारा पायी मोर्चा व तेथून तोपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर धडक मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत ॲड जाधव यांनी सांगितले
सरपंच परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सदर मोर्चा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ग्रामविकासाच्या लढ्यात योगदान द्यावे तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेच्याही सर्व पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या मोर्चा सहभागी व्हावे असेही आव्हान यावेळी केले. यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, जिल्हा समन्वयक पंडित धवन, कुलदीप कोलगे, एस के पाटील, वनिता सुरवसे यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.