• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे : पालकमंत्री भरणे

by Yes News Marathi
March 25, 2021
in मुख्य बातमी
0
येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे : पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. २५ :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना विरुध्दच्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीं आज केले.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रसाराला अटकाव करण्यासाठी प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग काम करीत आहेत. येत्या पंधरा दिवसांत कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याचे अंदाज वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांचा अवलंब केल्यास कोरोना प्रसाराला आळा घालू शकतो, असे भरणे यांनी म्हटले आहे.


कोरोना विषाणूचा प्रसार होत असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करुन भरणे म्हणाले की, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालक करावे. जिल्हा प्रशासनाने टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा आधारे कोरोना तपासणी व्यापक प्रमाणावर केली आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारची शंका आल्यास तत्काळ स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि तत्काळ उपचार करुन घ्यावेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दवाखान्यांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधीही देण्यात आला आहे.


आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन केले जात आहे. शहर आणि जिल्ह्यातील काही खासगी दवाखान्यातूनही लस देण्याचे नियोजन केले जात आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी याबाबत कसलीही शंका मनात ठेवू नये, असे आवाहनही भरणे यांनी केले आहे.

Previous Post

जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं; मोदींनी शेअर केले फोटो

Next Post

सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे

Next Post
सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे

सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे - आ.प्रणिती शिंदे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group