चोळ देशाचा राजा धर्मन्गड व राणी सत्यवती यांचा संसार सुखाने चाललेला होता. काही कालांतरांने संतान प्राप्ती झाली. हे संतान जगत नसत.कित्येक मुले जन्म घेतात व लगेच मरत असत.राजा राणी खुप दु:खी असायचे.व्रतवैकल्याचाही परिणाम काही केल्या जन्मलेल्या बाळांना आयुष्य मिळेना.मूल जगण्यासाठी काय करावे? राजदरबारातील विचारवंतांना, पुरोहितांना पंडित व विद्वानांना बोलावुन चर्चा करतात.
चर्चेअंती जर या देशाचा राजा यांना उत्तम संतानप्राती झाल्यास त्यादिवशी राज्यात एकही चुल पेटु नये.गाव जेवण देण्यात यावे.प्रत्येकांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा.चिमुकल्या बाळास आशिर्वाद द्यावा. कालांतराने राजा राणीस सुंदर अशी नवराञोत्सवाच्या पर्व काळात कन्यारत्न प्राप्त होतो.ठरल्याप्रमाणे राज्यात दवंडी पिटवुन कन्यारत्नाचे नामकरण करून हर्षोल्हासात आनंदोत्सव साजरा केला जातो.सर्व गावकरी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत प्रत्येकजण पाळण्यात निजलेल्या बाळाला आशिःर्वाद देऊन जातात.
शेवटी पार्वती देवी एका आजीच्या रूपात काठी टेकत टेकत पाळण्याजवळ येते आणि कन्यारत्नाला चल्लगा ब्रतुकु अम्मा''
(आयुष्यवंत हो) असा आशिर्वाद पार्वती देवी त्या कन्येला देते.. त्या आठवणी राहव्या म्हणुन तेलंगाणा प्रांतातली महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या (येंगिली पुव्वुला ब्रतुकम्मा) ते अष्टमी (सद्दुला ब्रतुकम्मा)पर्यंत साजरा करतात.हळदीने गौरीदेवी बनवुन निसर्गातील विविध रंगीबेरंगी फुले आणुन फुलांचा गोपुर बनवुन पारपारिक लोकगीते म्हणत ज्येष्ठ महिला घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्तीसाठी,विवाहित स्ञिया संतानप्राप्तीसाठी ,कुमारी उत्तम वर मिळणेसाठी या ब्रतुकम्मा भोवती बतुकम्मा बतुकम्मा उय्यालो (आयुष्यवंत हो, किर्तीवंत हो म्हणत अंगाई गीत गातात.)म्हणत युवती ,कुमारिका फेर धरतात. या वर्षातुन एकदा येणार्या ब्रतुकम्मा सणांचे महिला, भगिनी,नवीन लग्न झालेली सासुरवाशिण कधी एकदा माहेर जाऊ अलंकाराने नटुन थटुन भरजरी शालु नेसुन
बतकम्मा खेळ खेळण्यासाठी वाट बघत असतात.सोलापुरातील पुर्व भागात प्रत्येक घराघरात ही तेलंगाना संस्कृती या नवराञोत्सवाच्या अष्टमी दिनी दिसुन येतो. घरात सुखशांती नांदण्यासाठी भल्या पहाटेच घरासमोर सडा समांर्जन रांगोळी घालणे, विविध रंगाच्या फुलांनी सुंदर बतुकम्मा बनवुन गौरी देवीस नैवेद्यासाठी गुळ ,शेंगा, बडिशोप,ईलायची,चपाती पुटाणे,तुपापासुन बनविलेली चविष्ट लाडु(मलिदा लाडु),पुलोहरा,दहीभात,गोड भात बनवुन खेळ संपल्यानंतर एकमेकिंना नैवेद्य प्रसाद देतात.
या ब्रतुकम्मा सणाच्या निमित्ताने वयोवृध्द आजीपासुन एक वर्षाच्या चिमुकलीचा उत्साह पाहावयास मिळतो.हळदी कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांमध्ये आपुलकी ,आदर,प्रेम तेलुगु संस्कृतीचे दर्शन पहावयास मिळतो. पुर्व भागात हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करणेसाठी विविध मंडळे गेल्या काही वर्षांपासुन आकर्षक ब्रतकम्मा सजावट,पारंपारिक वेशभुषा करून फेर धरून खेळ खेळण्यासाठी,लोकगीते गाण्यासाठी पारितोषिके देत असतात.
पुर्व भागातील जुना वालचंद काॅलेज गेट समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे दरवर्षी हजारो महिला भगिनी अष्टमीदिनी या ब्रतुकम्मा महोत्सवात सहभागी होत असतात.
पण पूर्व भागातील प्रत्येक घरासमोर सायंकाळी ६ वाजता ब्रतुकम्मा उत्सव तेलुगु भगिनी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत.या दिवशी शहर परिसरातील विविध समाजातील महिला ही तेलुगु भगिनींचा हा ब्रतुकम्मा उत्सव पहाण्यासाठी हजेरी लावतात.