काँग्रेस पक्षात सत्यजित तांबेवर खरचं अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडावा, असा सल्लाही महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला. नगर जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे नेत्यांना सध्या काही काम राहिलेले नाही. काम नसल्याने त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पण त्यांनी कितीही वायफळ आणि तथ्यहीन पोपटपंची केली, जेवढ्या तारखा सांगतील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार, असा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
”सरकारच्या संदर्भात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांची किव येते. पण सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळे त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू आहे. पण त्यांनी किती जेवढ्या तारखा जाहीर करतील तेवढा शिंदे-फडणवीस सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेने निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. परंतू शिवसेनेने जनतेशी गद्दारी करून महाभकास आघाडी निर्माण केली. विचारांशी प्रतारणा झाल्यानेच एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार सरकारमधुन बाहेर पडले. निवडणूक आयोगानेही आता त्यांनाच बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे.
पण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासागेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे होणारे अनावरण होणार आहे. हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. परंतु त्या कार्यक्रमा ठाकरे गटाला दुर्बुध्दी सूचत आहे, अशी टिकाही यावेळी विखे- पाटील यांनी केली. त्याचबरोबर, नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व जो आदेश देतील त्या उमेदवाराचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील. असंही यावेळी त्यांनी सांगितलं.