• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन

by Yes News Marathi
April 4, 2026
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाचन छंद नव्हे जीवनशैली असली पाहिजे

सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात लेखक नीतिन वैद्य लिखित ‘वाचून उरणारी पुस्तके’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते लेखक नीतिन वैद्य, मुलाखतकार शिरीष देखणे आणि अभिवाचक विद्या लिमये यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन पार पडले.मुख्य कार्यक्रमाची सुरुवात विद्या लिमये यांच्या मंजुळ गायनाने झाली. त्यानंतर ‘वाचून उरणारी पुस्तके’ या पुस्तकातील निवडक लेखांचे प्रभावी अभिवाचन शिरीष देखणे आणि विद्या लिमये यांनी सादर केले. या अभिवाचनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मुलाखतीदरम्यान लेखक नीतिन वैद्य यांनी आपल्या वाचनप्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. “वाचनाची आवड मला आईकडून मिळाली.

लहानपणी शेजाऱ्यांकडे जाऊन वर्तमानपत्र वाचायचो. शालेय जीवनातच पत्रलेखनाची सवय लागली आणि माझी जवळपास १०० पत्रे दैनिकांत प्रसिद्ध झाली,” असे त्यांनी सांगितले. मर्यादित साधनसंपत्तीमध्ये वाढ झाल्याचे सांगत त्यांनी पुस्तकांच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित केले.“पुस्तके ही माणसांपेक्षा अधिक चांगले मित्र ठरू शकतात,” असे मत व्यक्त करत त्यांनी “वाचन ही जीवनशैली असली पाहिजे, छंद नव्हे” असा संदेश दिला. तसेच, “पुस्तके वाचल्यानंतर ती आपल्या मनात रुजतात आणि आयुष्याचा भाग बनतात, म्हणूनच या पुस्तकाला ‘वाचून उरणारी पुस्तके’ असे नाव दिले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.वाचनामुळे माणसामध्ये मौलिक बदल होतात, उत्तम वाचक हा संभाव्य लेखक असतो, तसेच एक पुस्तक अनेक नव्या विचारांचे दरवाजे उघडते, असेही त्यांनी नमूद केले.

विद्या लिमये यांनी वाचनावरील कविता सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर यांनी केले. या कार्यक्रमाला वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

Next Post

सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार…..

Next Post
सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार…..

सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार.....

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In