समृद्धी ग्रामविकास अभियानांतर्गत कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड आणि सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट विकासाच्या कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून ते शेवटच्या शेतापर्यंत जलसंधारणाची शाश्वत तंत्रे राबवून संपूर्ण परिसराचा पाणलोट क्षेत्र म्हणून विकास करणे हा आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश देगावकर यांनी केली. त्यांनी अभियानाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करत प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या CSR सहकार्याबाबत माहिती दिली.
प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी “शाश्वत जलसंधारण हे ग्रामविकासाचे मूलभूत अंग असून, प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करीत आहे” येत्या तीन वर्षात ही जलसंधारणाची कामे होणार असून गावकऱ्यांचा सहभाग गरजेचा आहे असे सांगून प्रकल्पासाठी निधी देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
डॉ. वडकबाळकरांनी पाणलोट क्षेत्र विकासाचे तांत्रिक, पर्यावरणीय आणि सामाजिक फायदे उलगडून सांगितले. त्याचबरोबर पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून व बंधाऱ्यात साठवून त्या पाण्याचं योग्य वापर करावा असं सांगत गावकऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून या बंधाऱ्यातील दर दोन चार वर्षांनी गाळ काढणे, स्वच्छता करणे अशा गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
डॉ. अजित देशपांडे यांनी कोरडवाहू शेतीच्या आव्हानांवर उपाय सुचवत शाश्वत शेतीची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर ज्यांच्याकडे भरड शेती आहे अशा शेतकऱ्यांनी वृक्ष शेती कडे वळावे अस आवाहन त्यांनी केलं.
याप्रसंगी प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेडचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे विनायक दुदगी त्याचबरोबर कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर,
उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे,
नेताजी पाटिल, सरकार पाटील,
विलास वाडकर,मल्लिनाथ येनगुरे,
शाम इटूकडे, शहाजान शेख,
मोहन जाधव,जालिंदर गायकवाड,
दत्तात्रय काटकर सर,लक्ष्मण ढेकळे,
निशिकांत पाटील,प्रदीप माने,
भरत चौगुले,भरत जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चन्नवीर बंकुर यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर शेवटी गावाचे सरपंच यशपाल वाडकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
“एक पाऊल समृद्ध गावाच्या दिशेने!”