सोलापूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणे साठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आॅनलाईन बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर , शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर उपस्थित होते
सिंीओ दिलीप स्वामी म्हणाले , जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची आहे. त्यानुसार सिईओ दिलीप स्वामी सर्व अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचना दिल्या.
‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविणेबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी विविध स्तरातून सहकार्य मिळविणेसाठी शाळा, कॉलेजेस, एन.सी.सी., एन.एस.एस., स्वयंसहाय्यता समूह, युवामंडळ इ. मधून तिरंगा वॉलेंटियर्स नियुक्त करावेत. तसेच प्रसारमाध्यमे, संकेतस्थळ, भिंतीचित्रे, दवंडी इ. द्वारे सदर उपक्रमास प्रसिद्धी देण्यात यावी.
लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, अध्यक्ष उपाध्यक्ष,सभापती. उपसभापती, सदस्य, सरपंच/उपसरपंच, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, खेळाडू, माजी जि.प.सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांचेद्वारा नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत आवाहन करण्यात यावे.
सदर उपक्रमांतर्गत गावातील वार्डनिहाय चार भाग करुन प्रत्येक एका भागाकरिता एक असे, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांचेवर सोपविण्यात यावी.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसभेकरिता पंचायत समिती स्तरावरुन एका अधिकारी/कर्मचारी यांची पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिले.ग्रामपंचायत स्तरासाठी नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) व शासकीय कार्यालये यांचेसाठी नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती यांची नेमूणक करावी.
तालुकास्तरावरील हर घर तिरंग्याची आकडेवारी संकलित करुन जिल्हास्तरावर आकडेवारी कळविणेसाठी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविणेसाठी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे.दिनांक 18.07.2022 रोजी तालुकास्तरावर व्यापारी असोसिएशन, सर्व संघटना, लायन्स क्लब, विद्यार्थी परिषद, रास्त भाव धान्य दुकान संघटना, मेडिकल असोसिएशन, एन.जी.ओ. यांची बैठक तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. दिनांक 20.07.2022 रोजी ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा आयोजित करण्यात यावी.दिनांक 21.07.2022 रोजी ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्राम सभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 (1) नुसार आयोजित करण्यात यावी. दिनांक 22.07.2022 रोजी सर्व शाळांमध्ये एक सभा तिरंग्यासाठी आयोजित करावी. सदर सभा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी.दिनांक 25.07.2022 रोजी ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. (इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा एक गट, इयत्ता 9वी व 10 वी साठी एक गट व इयत्ता 11 वी व 12 वी साठी एक गट करावा.) सदर निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजनाची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील.’ हर घर तिरंगा’ हा जास्तीत जास्त घरावर कसा लागेल याचे नियोजन करावे.
ध्वजाचे पावित्र्य राखा
ध्वजसंहितेनुसार ध्वजाचे पावित्र्य राखण्यात यावे. ध्वजाचा अवमान होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेणेत यावी. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.