सोलापूर – मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरील प्रताप नलावडे लिखित ‘आंतरवाली ते मुंबई’ हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर “आंतरवाली सराटी पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तकते मुंबई” हे पुस्तक आधारित आहे. बार्शीपुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. नलावडे यांनी औसा सभेच्या वेळी हे पुस्तक जरांगे-पाटील यांना भेट दिले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले,”असं नलावडेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला आहे.त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे.मराठा आरक्षणाची आवश्यकता,आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे,कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे. यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत ५८ मोर्चे काढले.
मात्र,पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही. त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे.