सोलापूर: “राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यासोबत आचारसंहितेची सुद्धा या पत्रकार परिषदेद्वारे घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.”