• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

by Yes News Marathi
February 9, 2021
in इतर घडामोडी
0
रेशीम उद्योगासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: राज्यात 25 जानेवारीपासून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. जिल्ह्यातील रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी मच्छिंद्र राऊत यांनी केले आहे.

अभियानामध्ये नोंदणी करणाऱ्या लाभार्थींना अनुदान

पहिल्या वर्षी 300 व दुसऱ्या वर्षापासून प्रतिवर्ष प्रती एकरी 800 अंडीपुंज खरेदी रकमेच्या 75 टक्के अनुदान शासन निर्णयानुसार मिळेल.

शासन मान्यताप्राप्त बाजारपेठेत कोष विक्री केल्यास आणि अनुदानाचे निकष पूर्ण केल्यास प्रती किलो 50 रूपये अनुदान मिळेल.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (एनटी), विमुक्त जमाती (डीटी), दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे कुटुंबे, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी. मनरेगा जॉबकार्डधारक असावा.स्वत:च्या लागवडीवर अकुशल म्हणून काम करणे आवश्यक आहे.तुती लागवडीची कमाल मर्यादा एक एकर आहे.

मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड, संगोपनगृह व संगोपन साहित्य यासाठी अकुशल आणि कुशल मिळून 3 लाख 26 हजार 790 रूपये तीन वर्षात विभागून दिली जाते. ही रक्कम तहसीलदारकडून लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते.

शेतकऱ्याला शेतात केलेल्या कामाची मजुरी आणि लागणारे साहित्य, संगोपनगृहाचे अनुदान, रेशीम कोष विक्रीपासून उत्पन्न मिळते. शेतकरी मनरेगा अंतर्गत व मनरेगाव्यतिरिक्त तुती लागवड करून रेशीम उद्योग करू शकतो. शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानामध्ये आपली नाव नोंदणी करून घ्यावी. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा ठराव करून 2021-22 च्या त्रैमासिक आराखड्यात आराखडा पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला सादर करावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, 13, उज्ज्वल हौसिंग सोसायटी, मुरारजी पेठ, सोलापूर किंवा दूरध्वनी 0217-2323148, इमेल[email protected] यावर संपर्क करावा.

Previous Post

अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा संकल्प; शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गडावर यंदा हिरव्या मशाली

Next Post

फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

Next Post
फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

फॅट पासून फिट बनवण्याची रोमांचक जर्नी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group