विधान परिषद निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचा विचार करता महापालिका,जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये भाजप सदस्यांची संख्या खूप मोठी आहे. 615 मतदारांपैकी 31६ मतदार हे कमळ चिन्हावर निवडून आलेले आहेत. शिवाय भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे सेना या महायुतीचा विचार करता राजेंद्र राऊत सव्वा पाचशे मते मिळणे अपेक्षित आहे. शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्याकडे हक्काची अवघी 80 मते आहेत. असे असले तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या दहा दिवसापासून सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर मध्ये या निवडणुकीसाठी तळ ठोकला आहे. क्रॉस व्होटिंग झाल्याचे मला मला कळते असा भाजप नगरसेवकांना दम भरून त्यांनी काही मतदारांना लक्ष्मी दर्शन देखील घडविले. भाजप नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका घेऊ नये म्हणून त्यांना व्हिप देखील बजावण्यात आला आहे.असे असली तरीही भाजपमध्ये धाकधूक आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून त्यामुळे मला जास्त मते पडतील असा दावा वसंत देशमुख यांनी केला आहे. उद्या सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत शहर जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर मतदान होणार असून 22 जून रोजी सोलापूर जिल्हा नियोजन भवनात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे नजरा लागल्या आहेत.










