युद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची निर्यात बंद झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यातच अवकाळी पावसाने सोलापूर शहर राज्यातील विविध जिल्ह्यात फळबागांचे आणि शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. हे संकट कमी आहे म्हणून की काय काही दलाल शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन युद्धामुळे लवकरच लॉकडाऊन होणार आहे… पेट्रोल डिझेल मिळणार नाही… अशी भीती घालून शेतीमालाची कवडीमोल किंमत करत आहेत. आंब्याच्या बागा, कलिंगड,टरबूज, द्राक्षे,केळी आदी फळबागा मनमानी पद्धतीने रेट डाऊन करून मागू लागले आहेत. भारताकडे 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण इंधन पुरेशा प्रमाणावर आहे असे वारंवार सांगत आहेत मात्र भीतीचे वातावरण असल्यामुळे अनेक जण याचे भांडवल करू लागले आहेत. त्यामुळे गॅस साठी रांगा दिसतात. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या दलालांना चाप लावण्याची गरज आहे.

