सोलापूर – सध्या सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थित निर्माण झाली.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर,अक्कलकोट, माढा,करमाळा आदी तालुक्यात पूर परिस्थित निर्माण झाली आहे. या तालुक्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे..यांना मदत करणे हे आपले समाज कार्य आहे. परंतु काही जणांना मदत करणे शक्य होत नाही..त्यांनी पूरग्रस्तांसाठी सद्भावना, देवा कडे प्रार्थना करावी..की पूर बाधित लोकांचे जीवन सुरळीत सुरू होऊ दे. असे देवा कडे मागणी करावी.. असे मत ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.


सोलापुरातील राजेश कोठे नगर येथील श्री संत मुक्ताई मंदिरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सव निमित्त आज श्रीमद् भागवत कथेची सांगता झाली. यावेळी इंगळे महाराज बोलत होतो.
पुढे बोलताना इंगळे महाराज म्हणाले,आपण सर्वांनी पूरग्रस्तांना आताच्या परिस्थितून बाहेर काढण्याची वेळ आहे. त्यांना आपण सर्वांनी आपल्या आपल्या परिस्थितीनी मदत केली पाहिजे..मदत करणे नाही समजले तरी आपण सर्वांनी पूरग्रस्तांना विषयी असे विचार प्रकट केले..



यावेळी ह. भ.प. अनंत महाराज इंगळे,ह. भ.प. तानाजी महाराज बेलेराव, जाधव, खरात, गुरुसिद्ध गायकवाड, अजिंक्य मोरे, अनिकेत भोसले तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या..

