• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर / करमाळा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे रखडले; परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकरी अडचणीत तर प्रशासन सुस्त

admin by admin
December 14, 2019
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

कायद्याच्या चौकटीत न अडवता शासनाने सरसकट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

गणेश जगताप

करमाळा – तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी वर्गास हैराण केले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे तर कापणी करण्यात आलेले पीक अक्षरशः खराब झाले आहे. खरीप हंगामातील कांदा, सूर्यफूल, बाजरी, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. शासनाने खरीप हंगामातील पिकांना तात्काळ पंचनामे करून सरसकट पीकविमा मंजूर करावा तसेच रब्बी हंगामातील पिकांचे तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तालुक्यासह जिल्ह्यात पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे मतदार संघातील पीक नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तालुक्यातील मंडळामधील पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची गरज आहे.

पावसाळा संपला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. मागील काही दिवसापासून तालुक्यात पावसाची दमदार हजेरी आहे. पावसामुळे ज्वारी, मका, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी तालुक्यात अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू नाही. नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार आणि नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बहुतांश शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेअंतर्गत विमा काढला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भेटला नसल्याने यंदा पीक विमा काढला नाही. नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हे शासनाच्या मदतीकडे आस लावून आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचणी अडचण येत आहेत. तसेच शासनाकडून अद्यापही करमाळा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. त्यातच शासनाकडून ४८ तासात शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळवावी अशी जाचक अट घातली आहे. काही शेतकऱ्यांच्या शिवारातून पाणी वाहत आहे. पर्यायाने शासनाला शेतकऱ्यांनी मदत द्यायची आहे की नाही असा संशय प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी पडत आहे?

ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा. कारण अनेकांचे पीक शेतातून काढता आले नाही. त्यामुळे पाऊस झाल्याने पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शासनाने पिक विमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यात मका 3952 हेक्टर, तुर 4342 हेक्टर, बाजरी 3828 हेक्टर, कांदा 1178 हेक्टर, सुर्यफुल 1336 हेक्टर, मूग 1160 हेक्टर, उडीद 845 हेक्टर यासह आणखी पिकांची लागण शेतकऱ्यांनी केली आहे. पण पावसामुळे या पिकाला नुकसान पोहोचले आहे.

सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी थोड्याशा पडलेल्या पावसावर खरिपाची पेरणी केली मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकऱ्याची सत्वपरीक्षा न पाहता त्यांना कायद्याच्या चौकटीत न अडवता शासनाने सरसकट अनुदान द्यावे व त्यांना सहकार्य करावे. – हरिश्चंद्र झिंजाडे (शेतकरी, पोथरे)

गेली दोन- तिन वर्षे शेतकरी दुष्काळी परिस्थीती मुळे खचला आहे. शेतकरी अगोदरच हवालदिल आहे. त्यातच परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाने शेतात पाणी साचले आहे. ज्वारी पिवळी पडली असुन ज्वारी वर आळी पडल्याचे दिसत आहे. मात्र कृषी विभाग व महसुल विभाग सुस्त आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जावुन तात्काळ पंचनामे करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल. – शाहुराव फरतडे (शिवसेना माजी तालुका प्रमुख करमाळा)

Previous Post

social / एसटी महामंडळही बसवणार ट्रॅकिंग सिस्टिम, गाड्यांचे लोकेशन कळणार

Next Post

टी-२० लीग / आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post

टी-२० लीग / आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

ताज्या बातम्या

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026