सोलापूरसह राज्यात यलो अलर्ट
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून काहीसा मंदावला आहे. दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसाने दडी मारली आहे. गुरुवारी ८ जुलैनंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.