येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणि काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याने आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात देखील संचारबंदी लागू झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. परंतु अद्याप तरी सोलापूर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही. आगामी आठ दिवसात जर जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले , त्याचप्रमाणे मास्कचा वापर केला व सातत्याने हात धुतले व स्वच्छता यासाठी सर्व नियमांचे पालन केले तर कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही. त्याचप्रमाणे संचारबंदीचे संकट टळू शकते, असे प्रशासनाने वारंवार स्पष्ट केले आहे.
मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करत पोलिसांनी दोन हजार रुपयांपर्यंत दंड करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक वाहन चालक मास्क तोंड व नाकावर न ठेवता हनुवटीवर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांना पोलिस प्रशासनातर्फे घरी बसण्याचा सल्ला देण्यात येत आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या आठवड्यात वाढताना दिसताहेत तालुक्याची ठिकाणे व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.