सोलापूर महापालिकेने सिद्धेश्वर तलाव परिसर सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल 18 कोटी रुपये खर्च केले. मात्र या तलावातील पाण्याचे पावित्र्य राखण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान , महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस उपाययोजना करत नाहीत त्यामुळे वर्षातून किमान दोन वेळा हजारो मासे मरतात. या घटनेची वारंवार पुनरावृत्ती होते मात्र सोलापूर करांची संवेदना कुठेतरी बोथट होऊ लागल्यामुळे या मुक्या जीवांचा हकनाक बळी जात आहे. शनिवारी या तलाव परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर मासे मेल्याचे दिसले. पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे आणि पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे हजारो मासे तोंड वर काढून अखेरच्या घटका मोजत आहेत. आम्हाला वारंवार इथल्या बातम्या देताना लाज वाटते मात्र इथल्या शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी एवढे बधिर का झाले आहेत हा प्रश्न कायम अनुतरीत आहे.
