येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्रात उकाडा वाढत चालला असून सामान्य नागरिकांनाच्या उन्हाच्या झळा सोसावा लागत आहे. येत्या 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील भागात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच येथील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.
मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गरम व कोरड्या उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे मुंबईत उष्णता वाढत आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्यामते 15 फेब्रुवारीपासून मुंबईत हवामान बदलण्यास सुरुवात होते.