येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढलेला पाहायला मिळतोय. चीनसह युरोपियन देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकेवर काढू लागला आहे. अशात भारतात कोरोनाची चौथी लाट येणार अशी भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे की, देशात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. अग्रवाल यांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसर्या लाटेसंदर्भातील सांगितलेले अंदाज खरे ठरले आहेत.
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मनिंद्र अग्रवाल यांचा दावा
प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत सांगितले आहे की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार चौथी लहर येण्याची शक्यता नाही. तसेच जरी कोरोनाची चौथी लाट आली तरी, देशातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाची चौथी लाट तिसऱ्या लाटेप्रमाणे कमी कालावधीसाठी आणि कमी घातक असेल. त्यांनी पुढे सांगितले आहे की, 90 टक्क्यांहून अधिक भारतीयांमध्ये कोरोनाच्या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती तयार झाली आहे.