• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

by Yes News Marathi
February 19, 2025
in इतर घडामोडी
0
राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरला लवकरच नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी शासन प्रयत्नशील

सोलापूर, 19 (जिमाका):- राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहाणी केली. प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात निवेदने सादर केली.
स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली.

येत्या 5 वर्षात 25 हजार बसेस घेणार
यावेळी परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले ” राज्य शासनाने दरवर्षी 5 हजार नवीन कोऱ्या एसटी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल.

या भेटी दरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानीच्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानीच्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानीच्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group