सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या पाहता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चेन्नई आयटी संस्थेने विकसित केलेले आयरेड हे मोबाईल ॲप लवकरच वापरली जाणार आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरटीओ सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग विभाग यांनी नोंदविलेल्या 67 ब्लॅक स्पॉट च्या ठिकाणी अपघात झाले असून त्यामध्ये 175 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील दहा शहरात हे आयरेड ॲप मोबाईल वापरण्यासाठी आणि अपघातावर नियंत्रण करण्यासाठी राज्यातील दहा शहरांचा समावेश केला आहे यामध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे हे विशेष. नागपूर औरंगाबाद बीड पालघर पुणे नाशिक यवतमाळ अहमदनगर जळगाव आणि सोलापूर शहरात हा पथदर्शी प्रकल्प आरटीओ ,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून साकारला जाणार आहे अपघात होताच घटनास्थळी पोहोचणाऱ्या पोलिसांना अपघाताची माहिती या ॲपमध्ये अपलोड करावी लागेल त्यामुळे अपघाताचे दोष वेळीच तीनही विभागांना समजणार असून त्यानंतर या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाहीत याबाबत तीनही विभाग काम करणार आहेत .सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघात देखील वाढले आहेत यासाठीच या मोबाईलच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी चांगली प्रयत्न होतील अशी आशा आहे.