येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना व निर्बंधामुळे एसटीचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षाही कमी झाले आहे. परिणामी एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली असून राज्य सरकारकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी के ली आहे. यातून कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्चासह दैनंदिन खर्च भागवला जाणार आहे.
मार्च २०२० पासून राज्यात करोनाचा विळखा वाढू लागला. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला. संसर्गाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली. त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे फक्त मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा आणि परराज्यात जाणाऱ्या कामगारांची वाहतूक के ली. टाळेबंदी शिथिल होताच एसटीची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली; परंतु उत्पन्न बुडाल्याने एक लाख कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले. त्या वेळी कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिन्यांचे वेतनही मिळत नव्हते. अखेर राज्य सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास सुरुवात झाली. एसटीला २०२०-२१ साठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांची मदत के ली. त्यामुळे एसटी तग धरू शकली. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. टाळेबंदी शिथिल होताच पुन्हा एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न काहीसे वाढू लागले; परंतु फे ब्रुवारी २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि त्याचा फटका एसटीला बसू लागला. करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे राज्यात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत गेली. एसटीमधून १५ फे ब्रुवारी रोजी ३३ लाख प्रवाशांनी प्रवास के ला होता. त्या वेळी १६ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते, तर मार्चच्या मध्यापर्यंत प्रवासी संख्या थेट २२ लाखांपर्यंत पोहोचतानाच दररोजचे उत्पन्न दहा कोट रुपयांपर्यंत गेले. त्यानंतर हा आलेख आणखी खाली होत गेला. करोनापूर्व काळात एसटीतून दररोज ५८ लाख प्रवासी प्रवास करीत होते आणि दररोज २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते; परंतु या उद्दिष्टापर्यंत एसटी आता पोहोचूच शकली नाही. पुन्हा लागलेल्या टाळेबंदीमुळे एसटीवर आणखी आर्थिक संकटच कोसळले. यातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी महामंडळाने के ली आहे. या संदर्भात व्यवस्थापैकीय संचालक शेखर चन्ने यांना विचारले असता, राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी के ल्याचे ते म्हणाले.