सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा दर मंगळवारचा जनावरांचा बाजार पूर्ववत चालू करावा अशी मागणी बुधवारी सिद्धाराम चाकोते यांनी केली आहे. सोलापूर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असल्याने आता जनावर बाजार चालू करण्याचाही निर्णय घ्यावा , असे निवेदन चाकोते यांनी बाजार समितीच्या सभापतींना दिले आहे. या निवेदनावर जनावरांचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत. यामध्ये दत्तात्रय मारुती भोसले, अंबादास मधुकर भोसले ,अशोक शंकर सुरवसे, मोहन मारुती भोसले ,नागेश विठ्ठल सुरवसे, अंकुश सुरवसे, सुनील तुकाराम धुमाळ, कोंडीबा दत्तात्रय सुरवसे आदी व्यापाऱ्यांचा समावेश केली आहे.