जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे.मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदारांकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.
पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केले आहेत.
गोठा नुकसान ३००० रु. प्रति
गोठादुभती जनावरे ३७,५०० रु. प्रति जनावर
ओढकाम करणारी जनावरे ३२,००० रु. प्रति जनावर
लहान जनावरे २०,००० रु. प्रति जनावर
शेळी/मेंढी ४००० रु. प्रति जनावर
कुक्कुटपालन (कोंबडी) १०० रु. प्रति कोंबडी

