• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक

by Yes News Marathi
January 9, 2021
in मुख्य बातमी
0
करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीयांनी करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केलं. करोना काळात भारतीयांनी खूप चांगलं काम केलं. एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात भारतीयांनी सेवाभावाचं दर्शन घडवलं, असं सांगत पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीयांना संबोधित केलं. नवी पिढी भलेही मूळांपासून (भारतापासून) दूर झाली असली, तरी संबंध मात्र टिकून आहेत, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी १६व्या प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”जग साक्षीदार आहे… जेव्हा जेव्हा भारताच्या सामर्थ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं गेलं, तेव्हा तेव्हा भारतीयांनी ते चुकीचं ठरवलं. भारत जेव्हा पारतंत्र्यात होता, तेव्हा युरोपातील लोक म्हणायचे भारत स्वतंत्र होऊ शकणार नाही. पण भारतीयांनी ते चुकीचं ठरवलं. भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर पश्चिमेकडील लोक म्हणायचे इतका गरीब देश एकजूट राहू शकत नाही. येथील लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. पण, भारताने तेही चुकीचं ठरवलं. आज भारतातील लोकशाही जगातील सर्वात यशस्वी आणि जिवंत लोकशाही आहे. भारतीय लोकशाही जगासाठी उत्तम उदाहरण बनली आहे,” असं मोदी म्हणाले.

“शांततेचा कालखंड असो वा युद्धाचा… भारतीयांनी निडरपणे सामना केला. दहशतवादविरोधी आघाडीवर भारताने दृढ निश्चयाने काम केले. मागील काही वर्षात प्रवासी भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. विविध देशांचे प्रमुख हे सांगत असतात की, कठीण परिस्थितीतही भारतीयांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे. आज भारतातील लसींची सगळे प्रतीक्षा करत आहेत. भारताच्या सामर्थ्याचा लाभ सगळ्यांनाच मिळत आला आहे. देशात तयार करण्यात आलेल्या दोन लसी मानवतेच्या हितासाठी काम करण्यास सज्ज आहेत,” असं मोदी म्हणाले.

“प्रवासी भारतीय जिथेही गेले, तिथे भारताचा प्रसार केला. त्यामुळे जगाला भारताविषयी विश्वास निर्माण झाला. भारत सरकार प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे. करोना काळात वंदे भारत मिशन अभियानातंर्गत ४५ लाख भारतीयांना मदतीचा हात दिला, असंही मोदी म्हणाले.

Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर

Next Post

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे

Next Post
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group