• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे

by Yes News Marathi
July 9, 2021
in मुख्य बातमी
0
आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (९ जुलै) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.
शुक्रवारी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या संत तुकाराम भवन येथे बैठक झाली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
सुरवातीला सचिन ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, सर्व संबधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामकाज याबाबत पुढाकार घेवून काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन व मंदीर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुध्द पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री.भरणे यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यावर संबधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या.
यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्षचा धनादेश

Next Post

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post
हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group