मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका करत ‘मंत्रिमंडळ विस्तार न होण हा जनतेचा अपमान’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जर सरकारकडे बहुमत आहे तर सिद्ध करा, असंही ते म्हणाले. याशिवाय 25 जुलै उजाडल्यानंतरही पावसाळी अधिवेशन अद्याप झालं नसल्याने यावरही पवारांनी टीका करत सरकारला जाब विचारला आहे. तसंत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ‘मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पण जनतेचं काय? ‘एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत काम केलं तेच आता कामांना स्थगिती देतं आहेत. ते दोघे काय सत्तेचा ताम्रपट घेउन आले आहेत का?’ असा सवालही पवारांनी विचारला आहे.
अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमत आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात परंतु जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही. असं अजित पवार म्हणाले आहेत.