सोलापूर- भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचारनिमित्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये निषेध करण्यात आले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडले असून भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेले अनन्वित अत्याचार, हिंसाचार याविरोधात बुधवारी कोरोनाच्या नियमांचे व सोशल डिन्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत प्रभागातील बुथ निहाय आंदोलन करण्यात आले. यावेळी 172,173,174, 187, 188, 221, 222, 223, 224, 225 या प्रत्येकी दोन बुथ प्रमाणे पाच ठिकाणी निदर्शने नोंदवण्यात आले. यावेळी दोन बुथ मधिल बुथ प्रमुखांना घेऊन ममता बॅनर्जी विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, भाजप शहर सरचिटणीस शशी थोरात, काशिनाथ होटकर, विजय कोळी आदींनी आंदोलन केले.
यावेळी बंगाल मधिल हिंसाचारनिमित्त भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून ममता बॅनर्जी यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. बंगालमध्ये एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा गुंडाराज सुरू आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहे अशी माहिती भाजप शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी दिले.याप्रसंगी काही बुथ मध्ये काळे झेंडे सह निदर्शने, जोडे मारो आंदोलन तर काही बुथवर प्रतिमेचे दहन करण्यात आले.