लातूर- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत धर्माची स्वतंत्र पीठ निर्माण करण्यात येणार असून यामध्ये महात्मा बसवेश्वर, शिवयोगी सिद्धरामेश्वर, माता अक्कमहादेवी, मन्मथ स्वामी, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज,प्रथम महिला जगद्गुरु माते महादेवी , यांच्या विचारांचे अनुभव मंटप उभारणार असल्याचे प्रतिपादन जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बंगळुरू यांनी केले.
लातूर येथील प्राध्यापक सुनील हेंगणे यांच्या बसव निलय निवासस्थानी जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बंगलोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीस अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती राज्य महासचिव तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे,लातूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोनाले,प्रा राजेश विभुते ,प्रा सुनील हेंगणे, इंजिनीयर कपिलधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार कत्ते ,लातूर जिल्हा समन्वयक लिंगायत समन्वय समितीचे प्रा. पुष्कराज खुबा, सौ उर्मिला बिराजदार, प्रा. संतोष तोडकर ,बसवेश्वर हेंगणे, बसवराज अश्टुरे ,चंद्रशेखर कत्ते ,महेश पटणे ,शिवा गुजर, महेश सौंदणे ,लक्ष्मण मुखडे , बसवराज रेकुळगे, लक्ष्मण किणीकर ,भीमाशंकर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाला सामाजिक समता,विश्वबंधुता , दासोह, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारे असे सर्व शरणांचे वचन साहित्य, शरणांचा इतिहास लिंगायत धर्म पिठात असणार आहे. सांस्कृतिक अध्यात्मिक पुरोगामी विचारांचे बसव सृष्टी उभारण्यात यावे असे सर्व मान्यवरांनी सूचना केले. लिंगायत धर्म पिठासाठी सोलापूर,नागपूर-वर्धा या ठिकाणच्या भक्तांनी जमीन दासोह करणार असल्याची माहिती राज्य सचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली आहे. प्रास्ताविक व स्वागत प्रा. सुनील हेंगणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर कत्ते यांनी मानले .