• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, (प्रतिनिधी):- कवी लेखक महेश खरात लिखित ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्य संग्रहामध्ये माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला असून मानवी मूल्यांचे जतन करणाऱ्या कविता या कविता संग्रहामध्ये असल्याचा सूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आयोजित परिसंवादामधून निघाला. रविवार दि. 20 डिसेंबर रोजी विजापूर रोड परिसरातील अंजनी मल्टि हॉलमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य कवी डॉ.राजेंद्र शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादामध्ये काव्य संग्रहाचे लेखक कवी महेश खरात, कवी समिक्षक महेंद्र कदम, कवी गोविंद काळे, कवी हेमकिरण पत्की, कवयत्रि वंदना कुलकर्णी यांनी सहभाग घेतला होता.

कवी महेश खरात यांनी त्यांच्या ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्य संग्रहामध्ये स्वातंत्र्याबाबतची व्याख्याही अत्यंत सखोलपणे मांडली आहे. असे भाष्य कवी हेमकिरण पत्की यांनी केले. तर वंदना कुलकर्णी बोलताना म्हणाल्या या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन करणारे काव्य साकारले आहे. गोविंद काळे यांनी सांगितले की या काव्यसंग्रहातून विविध विचार मांडण्याचा कवींनी प्रयत्न केला आहे. महेंद्र कदम यांनी या काव्यसंग्रहातून जीवनात घडणाऱ्या अनेक घडामोडींचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले तर या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र शेंडगे यांनी सांगितले ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याच्या या काव्य संग्रहातून लेखकाने आपल्या भावना व्यक्त करताना मानवी जीवनातील मूल्यांचे कथन केले आहेत. तर लेखक कवी महेश खरात यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहाबाबत बोलताना म्हणाले कविता संग्रह तयार करताना मनात जे जे आले आणि जीवनात जे जे घडले ते या काव्यसंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.

या परिसंवादाच्या प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक करून सहभागी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर जितेश कुलकर्णी आणि अमोल धाबळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका,नाट्यकलावंत डॉ. मीरा शेंडगे यांनी केले तर आभार जितेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या परिसंवादाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, कवी मारूती कटकधोंड, किसन दाडगे यांच्यासह रसिक श्रोते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड

Next Post

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर

Next Post
लोकमंगल  फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group