• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

by Yes News Marathi
July 26, 2021
in मुख्य बातमी
0
‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पतसंस्थेच्या आटीओे शाखेचे उद्घाटन

 सोलापूर/प्रतिनिधी- लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला लवकरच 20 वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण येईपर्यंत या पतसंस्थेला राज्यात दुसरे स्थान मिळवून देवू, असा विश्‍वास लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. या पतसंस्थेच्या विजापूर रोडवरील आरटीओच्या 46 व्या  शाखेचा शुभारंभ आ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणूनमाजी कुलगुरू डॉ.इरेश स्वामी हे याप्रसंगी उपस्थित होते.

राज्यात लोकमंगल पतसंस्था सद्या चौथ्या क्रमांकावर आहे, असे सांगून आ. देशमुख पुढे म्हणाले की , आज अठरा वर्षे झाली, ही संस्था स्थापन करून. पतसंस्थेचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. अजून सोलापूरसह जिल्ह्याच्या बाहेर  50 शाखा सुरू करण्याचा मानस आहे. तेव्हा ठेवीदार व लोकांचा विश्‍वास प्राप्त करून राज्यात दुसरे स्थान मिळवू. संस्था उभी करताना आम्ही नाममात्र असतो. रोपटे लावणे हे आमचे कर्तव्य आहे पण हातात हात घालून अशा संस्था वाढवण्याचे काम नागरिकांचे देखील आहे.  करोना आपत्तीत तीनशे पेक्षा अधिक लहान उद्योगांना कर्ज पुरवठा पतंस्थेने  केला, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रारंभी आ. देशमुख व डॉ.स्वामी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, उपाध्यक्ष निर्मला भगवान कुंभार, उपमहापौर राजेश काळे, उद्योगपती अजितकुमार मेहता, प्रा.विलास मोरे, शाम पाटील, निवृत्त तहसीलदार शाहू कदम आदी, तज्ज्ञ संचालक हरिश्‍चंद्र गवळी, संचालक सरोजनी विजयकुमार टिपे, समाधान पाटील, युवराज अप्पाराव गायकवाड, शहाजी साठे, मुलाणी ङ्गैयाज अहमद सरदार, देवकुळे सिद्राम, भीमाशंकर कलशेट्टी, एसबीआयचे  उबाळे, वसंतराव विधाते, मनोहर येळणे, कुंभकर्ण शिंदे, लक्ष्मण पाटील, हडलगी दाऊद,तांबोळी सिकंदर, विनोद खंदारे, स्वाती कसबे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.मोरे यांनी आभार मानले.

Previous Post

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो – प्रा.डॉ. सुहास पुजारी

Next Post

बार्शी ही गुणवत्तेची खाण; चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

Next Post
बार्शी ही गुणवत्तेची खाण; चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

बार्शी ही गुणवत्तेची खाण; चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group