सोलापूर- सांगली पूरानंतर संभाव्य धोके निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर महानगर पालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करून पालिकेनी पूरग्रस्ता प्रती एक सामाजिक बांधिलकी जोपासत सांगलीकरांना एक मदतीचा हात पुढे केला आहे.सांगली पुरानंतर करण्यात येणा-या सफाई करिता सोलापूर महानगरपालिकेकडून मंगळवारी 40 सफाई कर्मचारी एक अग्निशमन दलाचे एक पथक पाठविण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सभागृह नेते शिवानंद पाटील,नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, गुरूशांत धुत्तरगावकर,नागेश भोगडे, गणेश पुजारी, आदींच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मदतीच्या गाड्या सांगलीकडे रवाना झाले.
सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत सांगली परिसरात पूरा नंतर संभाव्य धोका निर्माण होऊ नये म्हणून सफाई कर्मचारी आणि सफाई साहीत्य पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर श्रीकांचन यन्नम यांनी दिली.आवश्यकतेनुसार यापुढे देखील सांगली पूरग्रस्तांना मदत केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.