येस न्युज मराठी नेटवर्क : देशात यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक उसाचे गाळप होणार आहे. दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या वर्षी ऊस -ऊसच आहे त्यामुळे मराठवाड्यातील कारखाने मे अखेरपर्यंत चालतील असा अंदाज आहे. राज्यात 197 साखर कारखाने सुरू असून त्यांनी आजवर शंभर दिवसात सात कोटी 72 लाख 93 हजार टन उसाचे गाळप केले आहे. सोलापूरात सर्वाधिक म्हणजे 46 कारखाने सुरू असून त्यांनी एक कोटी 83 लाख टन उसाचे गाळप केले आहे ऊस गाळपात तसेच साखर उत्पादनामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे अहमदनगर आणि नांदेड मध्ये प्रत्येकी 27 कारखाने सुरू आहेत तर कोल्हापुरात 36 आणि पुण्यामध्ये 29 कारखाने सुरू आहे औरंगाबाद मध्ये 25 कारखाने सुरू आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी उच्चांकी साखर उत्पादन महाराष्ट्र राज्यात होणार असून साखरेचे भाव कोसळतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे