• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाआघाडी सरकारचा पापाचा घडा भरला : आ.सुभाष देशमुख

by Yes News Marathi
August 30, 2021
in इतर घडामोडी
0
महाआघाडी सरकारचा पापाचा घडा भरला : आ.सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंदिर मागण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन
सोलापूर (प्रतिनिधी) : तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती महाआघाडी सरकार आल्यापासून राज्याची झाली आहे. एकीकडे दारू दुकाने, बिअरबार सुरू आहेत. यातून शासन कोट्यवधींची माया गोळा करत आहे मात्र दुसरीकडे देवाला भेटण्यासाठी जनता आतुर झाली असतानाही मंदिर बंद करण्याचे पाप या शासनाकडून सुरू आहे.या सरकारचा पापाचा घडा भरला असून आता जनता या सरकारला त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते.
कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशावर आले आहे. राज्यात फार भयानक परिस्थिती आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. सर्व बिअरबार, दारू दुकाने सुरू करून सरकार वसुली करण्याच्या नादात आहे. त्यांना सामान्य जनतेची कोणतीही पर्वा नाही. सध्या भक्तगण देवाला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत मात्र त्यांना देवापासून लांब ठेवण्याचे पाप या सरकारकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हा घंटानाद ऐकून तरी या शासनाला मंदिर उघडण्याची बुद्धी येईल, असेही आ. देशमुख म्हणाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धवा धुंद तुझे सरकार अशी घोषणाबाजी केली.या आंदोलनात नगरसेविका राजश्री चव्हाण, बिज्जू प्रधाने, शशी थोरात, महेश देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थिती होती.

शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळले
मंदिर अद्यापही बंद ठेवून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचे सिद्ध होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ते हिंदुत्व सोडूनच सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जनता निश्चितच धडा शिकवेल, अशी टीका आमदार देशमुख यांनी यावेळी केली.

Previous Post

फिल्म फेडरेशन कार्यकारिणीवर डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड

Next Post

परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम – झाडाचा वाढदिवस

Next Post
परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम – झाडाचा वाढदिवस

परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम - झाडाचा वाढदिवस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group