विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आणि त्या अनुषंगाने उद्याच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय तरतुदी होणार याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यातील एक कोटी 33 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 25 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. ही कर्जमाफी करण्यासाठी शासनाला किमान 35 ते 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना यामुळे विविध विकास कामावर होणारा परिणाम आणि त्यातच शेतकरी कर्जमाफी करण्यासंदर्भात चा रेटा यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा कर्जाचा भार आणखीनच वाढणार असे दिसते. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आकडेवारी शासनाने जमा केली आहे. त्यामुळे याच अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस करतील का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

