सोलापूर : वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला. तो आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये ताबडतोब बदल करून चालत वारीसाठी निर्णय जाहीर करावा.या संदर्भात PM ऑफिस व CM ऑफिस ला तक्रार दाखल केली आहे.
वारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती.केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे.आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासनारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी व लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय जाहीर करावा अशी मागणी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, कुमार गायकवाड, चंद्रकांत जांभळे, गणेश वारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.