सोलापुरातील एकमेव संत तुकाराम महाराज मंदिर अशोक चौकात आहे. ९० वर्षांपूर्वी शिवराम महाराज मोरे यांनी मंदिराची स्थापना केली. तब्बल ९० वर्षांनंतर म्हणजे त्यांच्या ९ व्या पिढीने मंदिराचा कळसारोहण आणि विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोमवारी दुपारी केली. संत तुकाराम महाराजांची मूर्ती त्याकाळी जयपूरहून आणली होती. आज स्थापना केलेली विठ्ठलाची मूर्ती पंढपूरहून आणली आहे.
होमहवन, रूद्रपूजा, महाआरती, हरिकीर्तन सोहळा अशा मंगलमय व चैतन्यमय भक्तिभावात उत्सव पार पडला. पाचशेहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. मंदिरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली होती. पूजा मांडली होती.

मोरे परिवारातील नववी पिढी म्हणजे विष्णुपंत श्रीरंग मोरे महाराज. आता त्यांची पुढची पिढी म्हणजे मुले निवृत्ती व भगवंत आहेत. अकरावी पिढी म्हणजे चैतन्य निवृत्ती मोरे महाराज. मोरे परिवारातील सगळेजण मृदंग व पखवाज वादन करतात. अभंग गायन, कीर्तन करतात. मंदिरात दररोज आरती, वार्षिक उत्सव साजरा होतो.
कळसाचे दर्शन महत्त्वाचे
स म्हणजे देवाच स्वरूप आहे. मंदिरावरील कळस
ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा कळस खेचून घेतो. तीच ऊर्जा मंदिरात साठवली जाते. भाविक जेव्हा मंदिरात दर्शनाला येतात तेव्हा त्यांना चैतन्य लहरीतून आनंद व सात्विक ऊर्जा मिळते, असे निरूपण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. सुरुवातीला त्यांच्या हस्ते कळसारोहण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना याचे महत्त्व विषद हरी कीर्तनातून मांडताना ते म्हणाले, “गाभा-यात देवाची मूर्ती शक्तीच संक्रमण करते. त्याचे तेज, मांगल्य हे भक्तामध्ये बिंबते. देवाच्या पाया पडताना मनात सात्विक भाव येतात. ते मांगल्याचे प्रतीक आहे.
सोहळ्याने आनंद झाला
९० वर्षापूर्वी पूर्वजांनी मंदिराची स्थापना केली. माझी पत्नी शकुंतला चार वर्षापासून
आजारी आहे. तिलाही हे कार्य व्हावं म्हणून मनात रुखरूख होती. आज या सोहळ्याचा योग देवाने जुळवून आणला. आज मी खूप आनंदी आहे.
विष्णुपंत श्रीरंग मोरे, महाराज. मंदिराचे प्रमुख,