येस न्युज मराठी नेटवर्क :राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेत असताना महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. यावरुन भाजपा टीका करत असून महाविकास आघाडी नाटक कंपनी असल्याचे म्हणत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नामांतराचं समर्थन केले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मात्र विरोध कायम असल्याचं सांगत आहे. त्यातच आता भाजपा खासदार उदयनराजे भोसेल यांनी नामांतराच्या वादात उडी घेतली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
“औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय लोकच घेतील. बॉम्बेचे मुंबई केले तसे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय लोक भावनेतूनच व्हावा. औरंगाबादचे नामांतरण करताना राज्यात उद्रेक होणार नाही याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे,” असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.