• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी? पहा ही बातमी

by Yes News Marathi
December 24, 2020
in मुख्य बातमी
0
रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी? पहा ही बातमी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु अर्थात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. मात्र, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

रात्रीच्या संचारबंदीबाबत मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. रात्रीच्या वेळेत आजिबातच घराबाहेर पडायचंच नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या या शंकांचं निरसन करताना पोलिसांनी सांगितलं की, मुंबईत रात्रीची संचारबंदी असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चारपेक्षा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रात्रीच्या संचारबंदीतून कशाला मुभा, कशावर बंदी?

नागरिकांनी आजिबातच घराबाहेर पडायचं नाही, अशी कुठलीही सक्ती नाही.
अत्यावश्यक कामासाठी किंवा इतर कारणासाठी दोघे जण घराबाहेर पडू शकतात.
दुचाकी आणि कारमधून नेहमीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. पण कारमधून चारपेक्षा जास्त जणांनी प्रवास टाळावा.
कामावरुन उशिरा सुटणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या वेळेत प्रवास करण्यास अडचण नाही.
अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्यांना संचारबंदीची सक्ती नाही.
पब, हॉटेल, सिनेमागृह अशा करमणुकीची आस्थापनं रात्री अकरा वाजता बंद करणं बंधनकारक.

Previous Post

प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next Post

साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

Next Post
साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई : २५५ कोटींची मालमत्ता जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group