जमिनीच्या वादातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे तिहेरी हत्याकांड करणारा क्रूरकर्मा शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. आपल्या मृत पतीचा जमिनीमध्ये हिस्सा मागणाऱ्या भाऊजई गायत्री तसेच त्यांचा मुलगा शिवराज आणि मुलगी प्रियांका या तिघांचा शंकर मस्के यांनी खून केला. त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले. यामध्ये शंकर मस्के यांची पत्नी राणी मुलगी दीक्षा तसेच मुलगा धीरज, मेहुणा सुरज मोरे, त्याच्या हॉटेलमधील कामगार सचिन वाघमारे यांना सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांनाही आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. पश्चिम बंगाल येथे पळून गेलेला मुख्य आरोपी शंकर मस्के याला सोलापुरात आणले असून आज त्यालाही कोर्टात उभे केले जाणार आहे. हे प्रकरण सोलापुरात चांगलेच गाजत आहे.

