• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, July 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

“दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची पुण्यात ग्वाही

by Yes News Marathi
June 21, 2025
in इतर घडामोडी
0
“दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची पुण्यात ग्वाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेतच विरले का? असा सवाल विरोधक करत आहेत.


यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्याचं सांगितलं होतं. ‘सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही’, असं म्हणत अजित पवारांनी पीक कर्जाची परतफेड करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. पण यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ जून) पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे. कर्जमाफी कधी करायची? याबद्दल काही नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे. तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Previous Post

योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

Next Post
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group