इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ‘नवरत्न’ म्हणून सूचीबद्ध कंपनी आहे. IRCTC ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग, केटरिंग, पर्यटन, रेल नीर आणि हॉस्पिटॅलिटी सेवांसह विविध सेवा देते. आयआरसीटीसीचे उद्दिष्ट संपूर्ण भारतभर प्रवास अधिक सोयीस्कर, आनंददायी आणि परवडणारा बनवणे आहे.


आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने १९.०७.२०२५ रोजी सोलापूरहून आणि ०५.०८.२०२५ रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. आयआरसीटीसीच्या भारत गौरव टूर पॅकेजेस द्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते, जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याच बरोबर आरामदायी रेल्वे प्रवासयाची सुद्धा हामी देते. १९.०७.२०२५ रोजी सोलापूरहून सुरु होणाऱ्या टूर पाककजे ची किंमत प्रति व्यक्ती २२८२०/- रुपये आणि ०५.०८.२०२५ रोजी मडगावहून सुरु होणाऱ्या टूर पाककजे ची किंमत प्रति व्यक्ती अंदाजे २३८८०/- रुपये पासून सुरू होते.
पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, आमचे ध्येय प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी बनवणे आहे, जेणेकरून प्रत्येक ट्रिप संस्मरणीय होईल. हे पॅकेज सुविधा, आराम आणि खिशाला परवडणारे असावे ह्या उद्देश्याने डिझाईन केले आहे, ज्यामुळे प्रवाश्यांना श्रावणात भारतातील उत्कृष्ट आणि लोकप्रिय स्थळांना एक्सप्लोर करण्याची संधी मिळते. या पॅकेजेससाठी पर्यटकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पॅकेज ऑनलाईन होताच आयआरसीटीसीचे नियमित ग्राहक, आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेत स्थळावरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
भारत गौरव गाड्यांमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी III टियर आणि एसी II टियर कोचचे मिश्रण असते. या गाड्यांच्या बाहेरील भागात लोकप्रिय भारतीय स्मारके, शिल्पे, खुणा आणि नृत्य प्रकार इत्यादींचे प्रदर्शन केले जाते. गाडीची एकूण क्षमता सुमारे 600-700 प्रवासी घेऊन जाण्याची आहे. गाडी मध्ये पब्लिक अनाऊनसमेंट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ताजे जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे.