सोलापूर,(प्रतिनिधी):- ईशान्य भारतातील सर्व राज्यातील संस्कृती वेगळी आहे. त्याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला मिळावा म्हणून सोलापूर मध्ये ऑक्टेव्ह25 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले.
प्रारंभी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नटराज पुतळ्याला पुष्पहार अर्पित करून त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ऑक्टिव्ह 25 सोलापूरचा उद्घाटन करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल
सीपी राधाकृष्णन यांच्याकडून संदेश
मला व्यक्तिशः यायला आवडलं असतं पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता येत नाही तरी सर्व सोलापूरकराना मनापासून कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी याचा आनंद जरूर घ्या धन्यवाद.
बिभीषण चवरे सांस्कृतिक कार्य संचालक मुंबई आणि संचालक दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर
2025 या कार्यक्रमासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद, साउथ सेंट्रल कल्चरल सेंटरच्या आस्था कार्लेकर, गोगाई, कुलकर्णी उपस्थित असणारे सर्व पत्रकार आपण सर्व रसिक मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाबद्दल एक मिनिटाचे मी प्रास्ताविक करतो फक्त ईशान्यकडील आठ राज्य आहेत. त्या राज्याची संस्कृती आपल्याला कळावी, लोकसंस्कृती आहे, लोकसाहित्य आहे, तिथं पेहराव कसा असतो, तिथलं जेवण खान कसा असतं, तो कोणत्या वस्तू वापरल्या जातात, याची आपल्याला थोडक्यात माहिती हवी यासाठी हा तीन दिवसाचा कार्यक्रम आपण करत आहोत. हा कार्यक्रम जरी केंद्र सरकारचा संस्कृती विभाग मंत्रालय करत असलं तरी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग याच्यासाठी सपोर्ट करत आहे. सगळा आताच आमच्या मंत्री महोदयांचा आपण भाषण ऐकला असेल की एक भारत श्रेष्ठ भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये दुसऱ्या राज्यातील लोककलेच संस्कृतीचं दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये दर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात महाराष्ट्र ही महाराष्ट्र संस्कृती ही बाहेरच्या राज्यांमध्ये बऱ्याच वेळेस आम्ही घेऊन जात असतो तिथेही कार्यक्रम करत असतो आमच्या मंत्री महोदयाने नुकतीच एक घोषणा केली होती की आर्थिक वर्षात बाराशे कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत होणार आहेत 365 दिवसात म्हणजे आपल्याला याच्यातून एक लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्य विभाग आता या लोककलेच संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी एक तरतूद करत आहे आमच्या विभागाचे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे साहेब आणि आमचे मंत्री महोदय एडवोकेट आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत कालच आम्ही एकाच दिवसांमध्ये 44 कार्यक्रम महाराष्ट्रात केलेले आहेत हे खूप मोठी गोष्ट केलेली आहे 35 दिवसात २७४ कार्यक्रम आम्ही केलेले आहेत महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम कधीच होत नव्हते आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत आहोत सोलापूरमध्ये सुद्धा हा पाचवा सहावा कार्यक्रम आहे. आणि ऑक्टिव्हच्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की हा कार्यक्रम 2008 ला एकदा मुंबईत झाला होता त्यानंतर आता सोलापूरला होतोय आणि पुन्हा तो सोलापूरला होणार नाही कारण एका सिटीत एकदा कार्यक्रम झाल्यानंतर तो पुन्हा नंतर होत नाही त्यामुळे सोलापूरकरांना आवाहन आहे आमचं की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आपण थोड्यावेळाने पाहणार आहोत की किती वेगवेगळ्या प्रकारची यांची नृत्य म्हणजे डान्स आहेत गाणी आहेत वाद्य वाजवण्याचे त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला पहावयास मिळणार आहेत आपण या सर्वांचा आस्वाद घ्यावा आणि उद्यापासून जास्तीत जास्त गर्दी करावी असे मी आपल्याला आव्हान करतो आणि माझं मनोगत संपवतो.
कुमार आशीर्वाद :
या ठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार प्रेक्षक गण, सोलापूरचे नागरिक महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा भारत सरकारची सांस्कृतिक मंत्रालय मार्फत पूर्वोत्तर राज्यांची समृद्ध संस्कृती दर्शविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ओक्टिव्ह 2025 च्या आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
पुढील तीन दिवस साडेसहा ते साडेनऊ वाजता पूर्वोत्तर राज्यातून तब्बल 400 कलाकार आपल्यासमोर त्यांचे लोकसंख्येची सादरीकरण करतील. फक्त लोकसंस्कृती ही नाही, त्यांच्या खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, आणि त्यांचे पूर्ण जीवनशैलीचे पण अनुभव करण्याची आपल्याला संधी मिळेल, या ठिकाणी पूर्वोत्तर चे आठ राज्यांचे स्टॉल्स पण उभे करण्यात आलेले आहेत. प्रदर्शन आणि खरेदीच्या माध्यमातून त्यांच्या संस्कृतीच्या अनुभव पण आपण घेऊ शकतात.
जे नागरिक उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती असेल की, आयुष्यात एक वेळी अवश्य आपण पूर्वोत्तर राज्य फिरायला जा. शेवटी मी सर्व प्रेक्षकांना प्रेक्षकांना आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना विनंती करतो की, आपण हा कार्यक्रमाचे माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचे अनुभव घ्यावे.
असं सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीन दिवस चालणाऱ्या उत्सवातील कला संस्कृती खाद्य संस्कृती अनुभवा असं सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कुमार आशिर्वाद : पूर्व- उत्तर राज्यातील सिक्कीमचा अनुभव स्वतःच्या शब्दात सांगितला.
मी स्वतः सिक्कीम मिझोराम आणि मेघालय फिरलो आहे. 2019 मध्ये आणि एवढा सुंदर आणि एवढा निसर्गरम्य आहे. पूर्वोत्तर की एक वेळ गेल्यावर परत येण्याचं मन करत नाही. मी सहा दिवस ची सुट्टी घेऊन गेलो होतो. सहा दिवस संपल्यानंतर मी माझे वरिष्ठ अधिकारी माननीय विभागीय साहेबांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली की, चार दिवस पुन्हा मला सुट्टी थोडा वाढवून द्यावे, त्यांनी विनंती मान्य केली. चार दिवस संपल्यावर मी पुन्हा त्यांना कॉल केला आणि सांगितला की, मला अजून तीन दिवस ची सुट्टी द्यावी. त्यांनी सांगितले की, तीन दिवस नाही आता तुम्ही तीस वर्षे सुट्टी घ्या आणि तिथेच तुम्ही राहा, तिथेच तुम्ही दुसरी नोकरी शोधून शटल होऊन जा, परत येण्याची शक्यता नाही, त्यानंतर मी पटकन आलो.
हा स्वअनुभव उपस्थितांसमोर ठेऊन पूर्वोत्तर निसर्ग सौदर्याचं कौतुक करायला विसरले नाहीत.