सोलापूर – जिल्हा प्रशासन, सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेस शहरातील विविध शाळेतील 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद उद्यान येथे समारोप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने एकूण 2000 पदयात्रेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद उद्यान या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे संचालक योगेश कुंदुर,वेंदात तालिकोटी, अनुप कस्तुरे यांच्या हस्ते फळाचे,व बिस्किटांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
नेहमी ही संस्था सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा इत्यादी कार्यात सहभागी असतो आस्था सामाजिक संस्थेनी आजही विद्यार्थीबद्दल आस्था दाखवून त्यांना फळांचे वाटप केले .हा उपक्रम राबवण्यासाठी पिंटू कस्तुरे,सिद्धू बेऊर,सुरज छंचुरे,उदय छंचुरे, प्रथमेश गावडे, योगेश आरळीमार, महेश नागणसुरे, यांनी परिश्रम घेतले