येस न्युज मराठी नेटवर्क ; एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपचा पर्यायने देवेंद्र फडणवीसांच्या ट्रॅप आहे. शिंदे गटातील ४० पैकी २० आमदारांना फोडून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीम दाखल करून घेतले तर नवल वाटणार नाही. भाजपचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. देवेंद्र उस बला का नाम है, अशी खोचक टिपणी सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.
माझी हयात आंबेडकर चळवळीत गेली हे सांगत असताना आता मत परिवर्तन झाले का? या विषयावर उत्तर देताना अंधारे भडकल्या. याबाबत आपण १५० वेळा मुलाखती देऊन खुलासे केल्याचे त्या म्हणाल्या. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. यावर अंधारे यांना प्रश्न केला गेला. AU म्हणजे अनन्या उदास असे वारंवार रिया चक्रवतीने सांगूनही चुकीच्या पद्धतीने टीका होत असल्याचे उत्तर अंधारे यांनी यावेळी दिले.
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी नेमून आणि टीका करून यांना अधिवेशनाचा काळा वाया घालवायचा आहे. मूळात यांना अधिवेशनात चर्चाच घडवून आणायची नाहीए. ८३ कोटीचा भूखंड दोन कोटीला कसा विकला? यावर त्यांना चर्चाच करायची नव्हती. १५ लोकांना क्लीन चिट देता, त्यावर चर्चा करत नाही. जी माणसं बोलणारी आहे, त्यांना निलंबित केलं जातं. जयंत पाटील यांना निलंबित करता. जयंत पाटील यांनी अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणाची कारकिर्द आहे. यामुळे लोक बघत आहे हे सर्व. लोक विसरत नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत. पेड कीर्तनकार आहेत, माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपमाझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपअशी टीका अंधारे यांनी वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर केली. माझ्या वक्तव्या सारखे सावरकरांनी, श्री रविशंकर यांनीही लिहिले आहे. त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिक प्रश्न का विचारत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यावेळी केला.