लाल सलामी च्या घोषणांनी शिवछत्रपती रंगभवन दुमदुमले !
राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी हिंदुत्ववादाची निर्मिती – डॉ.उदय नारकर
सोलापूर : रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सोलापूर जिल्हा अधिवेशन राज्य सचिव माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव ऍड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती रंगभवन येथे ध्वजारोहण करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. उदय नारकर यांनी सोलापूर 23 व्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन केले.
अधिवेशनाच्या उद्घाघटन प्रसंगी बोलताना डॉ.उदय नारकर म्हणाले की,राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी विनायक सावरकर यांनी हिंदुत्ववाद हा शब्द निर्माण करून जाणीवपूर्वक रुजवले अशा सावरकरांचे अनुयायी मोदी सरकार शेतकरी कायदा पटवून देण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले, मार्गावर खिळे ठोकले अर्थातच शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी जेवढे मार्ग अवलंबले नसतील तेवढे मार्ग मोदी सरकार अवलंबले.अशी जहरी टीका उदय नारकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आमची संतभक्ती आहे तर त्यांची संघभक्ती आहे,आमची संतभक्ती म्हणजे सर्व धर्मियांची एकजूट व सर्वांना समतेच्या मार्गावर घेऊन जाणारी आहे.
‘लाल झेंड्याखाली निर्माण होत असलेले जगातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर पाहून बाहेर पडताना प्रत्येकाच्या तोंडून माझा भारत असा असावा’ असे वाटते.असे गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर माकप चे राज्य सचिव मंडळ सदस्य किसन गुजर,अधिवेशन अध्यक्षीय मंडळ समिती नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी यांच्यासह सिद्धपा कलशेट्टी, युसूफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला,म.हनिफ सातखेड,रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार नगरसेविका कामिनी आडम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकने क्रांतिकारी गीत गाऊन स्फुल्लिंग चेतावले. यावेळी इतिवृतांत लेखन समितीचे प्रमुख सिद्धराम उमराणी यांच्यासह किशोर मेहता,पुष्पा पाटील,इलियास सिद्दीकी आदी उपस्थित होते.